बुधवार, ११ जानेवारी, २०१७

एका वास्तवाचा दंश !
कविता-रती, दिवाळी २०१६ मधून
शेषांग   ( कवी : दत्तप्रसाद दाभोळकर )
मनापासून
“या”
म्हणत नाहीत.
उघडपणे
“जा”
म्हणत नाहीत.
खरंच
मुले आता मोठी झालीत !

एका अतिशय छोट्या कवितेत एका वास्तवाचा प्रचंड दंश करणारी ही कविता आहे. ह्यात आजकाल मुले मोठी झाली की आई-बापांबरोबर कशी वागतात, मनापासून या म्हणत नाहीत व लाजे काजे जा म्हणत नाहीत हे वास्तव मांडलेले आहे.
सगळ्यात बहार म्हणजे ह्या कवितेचे शीर्षक, जे आहे शेषांग ! शेष म्हणजे सर्पांचा राजा व त्याचे अंग म्हणजे मुले. साध्या भाषेत म्हणता येईल, सापाची अवलाद ! इथे केवळ मुलांनाच नावे नाहीत तर आईबापांनाही ! व्वा ! व्वा !
------------------------


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा