श्रीज्ञानेश्वरसमाधिवर्णन
( कवी : अरुण कोलटकर )
--------------------------------
स्वच्छ निळसर रिकामे अंबर
नारद तुंबर अभ्र विरे
कधी केले होते गंधर्वांनी
खळे
स्वतःशीच खेळे चंद्रबिंब
पांगले अवघ्या वैष्णवांचे
भार
ओसरला ज्वर मृदंगाचा
मंदावली वीणा विसावले टाळ
परतून गोपाळ घरी गेले
स्थिरावला हार वाळली
पाकळी
गुंतली फासळी निर्माल्यात
--------------------
कोणाची सय येणे,
आई मिस यू होणे, विरह होणे ह्या विरह भावनेच्या पहिल्या पायऱ्या धरल्या तर प्रियकर
आता कधीच भेटणार नाहीय ( किंवा तो मेलाय ) असे असेल तर विरहाचे टोक क्षोभाकडे अथवा
शोकाकडे जाते.
गणपतीचे विसर्जन
करताना “पुढच्या वर्षी लवकर या” अशी हमी तरी असते. पण समाधी घेताना सगळे आटोपतेच
त्याचे इथे मोठे मनोहारी वर्णन आहे. ज्याच्या ओढीने आपण दर्शनाला जावे त्याची
हुरहूर जशी वारकऱ्यांना वारीहून परतताना लागते त्याच्याच पुढची अवस्था इथे दिसत
आहे.
स्वच्छ निळसर आभाळ
आहे, ढग विरलेले असल्याने नारद, तुंबर असे सप्तर्षी दिसत आहेत. चंद्रबिंब आपल्याशीच
खेळत आहे ( ज्ञानेश्वरांचे असे विश्वाचे वर्णन आहे की ही प्रकृती “आपणच खेळे
आपणाशी”, त्याची आठवण इथे कोलटकर करून देत आहेत) आणि अशी शंका आहे की कोणा गंधर्वाने
चंद्राभोवती खळे केले आहे की काय ? ( त्याचा अर्थ आता कोणाचा तरी मृत्यू होणार
आहे.). वैष्णवांचे जे जथ्थे आले होते ते आता पांगले आहेत. टिपेला जाण्याचा
मृदुंगाचा ज्वर आता ओसरला आहे. विना मंदावली व टाळ विसावले आहेत व शिष्य/वारकरी
घरी परतून गेले आहेत. गळ्यातला हलणारा हार आता स्थिरावला असून पाकळी वाळली आहे.
ज्ञानेश्वरांच्या छातीची व हारातल्या देठाची “फासळी” ज्या हारात गुंतलेली आहे
त्याचे आता निर्माल्य झाले आहे.
भक्तांसाठी
फासळीचे निर्माल्य होणे ही विरहाच्या जरा पुढची पायरी इथे छान वर्णिली आहे !
------------------------