एका वास्तवाचा दंश !
कविता-रती,
दिवाळी २०१६ मधून
शेषांग ( कवी :
दत्तप्रसाद दाभोळकर )
मनापासून
“या”
म्हणत नाहीत.
उघडपणे
“जा”
म्हणत नाहीत.
खरंच
मुले आता मोठी झालीत !
एका अतिशय छोट्या
कवितेत एका वास्तवाचा प्रचंड दंश करणारी ही कविता आहे. ह्यात आजकाल मुले मोठी झाली
की आई-बापांबरोबर कशी वागतात, मनापासून या म्हणत नाहीत व लाजे काजे जा म्हणत नाहीत
हे वास्तव मांडलेले आहे.
सगळ्यात बहार
म्हणजे ह्या कवितेचे शीर्षक, जे आहे शेषांग ! शेष म्हणजे सर्पांचा राजा व त्याचे
अंग म्हणजे मुले. साध्या भाषेत म्हणता येईल, सापाची अवलाद ! इथे केवळ मुलांनाच
नावे नाहीत तर आईबापांनाही ! व्वा ! व्वा !
------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा